Pratap Sarnaik: आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन; ईडीकडे पत्राद्वारे केली 'ही' विनंती

Pratap Sarnaik शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. सकाळी वाजता ईडी कार्यालयात त्यांना हजर व्हायचे होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 25 Nov 2020, 8:51 pm
मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मंगळवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे ठाण्यातील घर आणि कार्यालय अशा दहा ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. पाच तासांच्या चौकशीनंतर त्यांना रात्री ८ वाजता सोडण्यात आले. ईडीच्या या कारवाईने मोठे वादळ उठले असताना व त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना आज यासंबधी बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ( Shiv Sena MLA Pratap Sarnaik Quarantines Self Day After ED Raids )
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रताप सरनाईक


वाचा: सरनाईक यांच्यानंतर संजय राऊत यांना ईडीची नोटीस? राऊतांनी केला खुलासा

ईडीने छापा टाकला तेव्हा प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र पुर्वेश हे घरी नव्हते. नंतर ते गोव्यात असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, सायंकाळी प्रताप सरनाईक मुंबईत दाखल झाले. त्यानंतर कोविडच्या नियमावलीनुसार त्यांना व पुर्वेश यांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे. मुंबईतच वांद्रे येथील घरी ते व पुर्वेश हे क्वारंटाइन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच ईडीने आज ११ वाजता कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली असली तरी प्रताप सरनाईक क्वारंटाइन असल्याने ईडीपुढे हजर होऊ शकले नाहीत.

वाचा: विहंग यांना ५ तासांच्या चौकशीनंतर सोडले; प्रताप सरनाईक आणखी आक्रमक

प्रताप सरनाईक यांच्या पत्नीच्या भावाने याबाबत ईडी कार्यालयात एक लेखी विनंती पत्र दिले असून त्यात वस्तुस्थिती मांडली आहे. प्रताप सरनाईक क्वारंटाइन आहेत व विहंग यांची पत्नी अनिता यांना हायपरटेन्शनमुळे ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विहंग हे सध्या त्यांच्यासोबत आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन चौकशीसाठी एक आठवड्याची मुदत मिळावी, अशी विनंती त्यात करण्यात आली आहे. सरनाईक यांच्या मेव्हण्याने प्रत्यक्ष ईडी कार्यालयात जाऊन हे विनंती पत्र संबंधितांकडे दिले आहे.

वाचा: ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; फडणवीसांनी पुन्हा केले मोठे विधान

दरम्यान, ईडीच्या पथकाने मंगळवारी सीआरपीएफ जवानाच्या संरक्षणात प्रताप सरनाईक यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. टॉप्स ग्रुपशी संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती. या कंपन्यांपैकी एका कंपनीच्या संचालक मंडळात विहंग सरनाईक यांचा समावेश आहे. ईडीच्या या कारवाईने मोठे वादळ उठले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत तर भाजपने या कारवाईत काहीच अयोग्य नसल्याचे म्हणत सरनाईक यांनी चौकशीला सामोरे जावे असे म्हटले आहे.

वाचा: सरनाईकांवरील कारवाई: पृथ्वीराज यांनी व्यक्त केली 'ही' शक्यता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज